कोल्हापूर – महाराष्ट्रात पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापुरची ओळख आहे, परंतु जिल्ह्यातल्या 60 गावांनी सिंचन प्रकल्प रखडल्याने लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र धामणी खोऱ्यातील 7 गावांनी मतदानावर घोषित केलेला बहिष्कार मागे घेवून मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे.
धामणी खोऱ्यातील काही गावांनी मतदानावर बहिष्कार घोषित केला होता. तथापी पन्हाळा तालुक्यतील कोदवडे, आकुर्डे, सुळे, वाघुर्डे, पनोत्रे आणि राधानगरी तालुक्यातील माणबेट आणि चौके या गावातील गावकऱ्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेवून मतदानाचा पवित्र हक्क बजावला,अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.