मुंबई – महायुती सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या समृद्धी महामार्गाचा विस्तार वाढणार आहे. परंतु तो परतमार्गी असणार आहे. कारण, पूर्वी नागपूर ते मुंबई असा प्रस्तावित असलेला समृद्धी महामार्ग उलट मार्गे नागपूरपासून कोसो दूर असलेल्या जिल्ह्यांना जोडल्या जाणार आहे. यामध्ये भंडारा ते गडचिरोली, नागपूर ते चंद्रपूर आणि नागपूर ते गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर यांना जोडणारा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र संकल्पनेतून साकार झालेला अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हिंदुऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पूर्ण झाला.
यंदाच्या दिवाळीत तर, त्यावरून विक्रमी वाहतूक झाली. याच महत्त्वकांक्षी महामार्गाचा पुढचा टप्पा म्हणजे, याच्या विस्ताराला मान्यता मिळाली आहे. आता हा महामार्ग नागपूर पासून पुढे गोंदियापर्यंत विस्तारला जाणार आहे.
राज्याची पूर्व व पश्चिम सीमा या निमित्ताने एकसंधपणे जोडली जाणार आहे अशी पोस्ट महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्वीटरवर केली आहे.
असा होणार समृद्धी महामार्गाचा विस्तार
भंडारा ते गडचिरोली – 142 किलो मीटर
नागपूर ते चंद्रपूर – 194 किलो मीटर
नागपूर ते गोंदिया – 162 किलो मीटर