नवी दिल्ली – भारत आत्मविश्वासाने भारला आहे. आत्मनिर्भरता आणि देशाला विकसित भारत बनवण्याची ही उर्जा २०२४ मध्येही कायम ठेवण्यात यावी, असे आवाहन पंतप्ऱधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केली आहे. आज मन की बात या आकाशवाणीवरील आपल्या कार्यक्रमातून ते देशवासियांना संबोधित करत होते. या कार्यक्रमाचा हा १०८ वा भाग होता.
पंतप्रधानांनी देशवासियांना नागरिकांना शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तता राखण्याच्या गरजेवर भर दिला. इशा फौंडेशनचे प्रणेते सद्गुरु जग्गी वासुदेव, भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू हरमनप्रीत कौर, बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि अभिनेता अक्षय कुमार यांनीही या कार्यक्रमातून संबोधन करून शारीरिक स्वास्थ्य कसे राखावे, याबाबत मार्गदर्शन केले.
२०२३ या वर्षात भारताने अनेक क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावाही पंतप्रधानांनी घेतला. आपण जे काम करू त्यामध्ये भारताचा पहिल्यांदा विचार करण्यात यावा, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. देशाचा विचार पहिल्यांदा केल्यानेच आपण देशाला आत्मनिर्भर आणि विकसित देश बनवू शकू, असे पंतप्रधान म्हणाले.
सरत्या वर्षामध्ये भारताने चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण केले. नाटू-नाटू या गीताला आणि द एलिफंट व्हिस्परर्स ? या लघुपटाला ऑस्कर पुर्सकार मिळाला. आशियाई क्रीडा स्पर्दांमध्ये बारतीय खेळाडूंनी १०७ आणि आशियाई पॅरा क्रीडा स्पर्दांमध्ये १११ पदके मिळवली. भारतीय क्रिकेटपटूंनी सर्व जगाचे मन जिंकले. तर १९ वर्षांखालील महिलांच्या क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्याचा आनंद सर्वांना प्रेरणा देणारा होता, असे पंतप्रधान म्हणाले.
देशाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहाने साजरा केला. या कालावधीमध्ये देशभरात सर्वांच्या सहभागातून ७० हजार अमृत सरोवरे बांधण्यात आली. नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या बाबत २०१५ मध्ये भारत ८१ व्या क्रमांकावर होता. तो आज ४० व्या क्रमांकावर आहे. हे सर्व यश सर्व भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांमधून साधलेले आहे. ही एक अभिमानाची बाब आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
भारताच्या पुढाकाराने भरड धान्याना संयुक्त राष्ट्राने हे वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरे करण्याची तयारी दाखवली. देशातील अनेक विद्यापिठांना आंतरराष्ट्रीय श्रेणी प्राप्त झाली. तसेच देशांतर्गत उत्पादनांना पेटंटही प्राप्त झाली.
भारत विकसित होण्याचा सर्वाधिक फायदा देशातील युवकांना होणार आहे. त्यासाठी युवकांनी आपले आरोग्य सुदृढ राखायला हवे. . आपल्या आहारामध्ये रासायनिक पदार्थांचा समावेश टाळूयात. योगाभ्यास करूयात. वेळेवर झोप आणि ध्यान करण्याची सवय लावूयात असे आवाहनही पंतप्रधानांनी युवकांना केले.
सावित्रीबाई फुले आणि राणी वेलू नचियार यांचेही स्मरण पंतप्रधानांनी केले.