मुंबई – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. महाराष्ट्राच्या सांगलीतील जत तालुक्यावर दावा करण्याची तयारी आम्ही करत असल्याचे विधान बसवराज यांनी बंगळूरमध्ये केले. त्यांचा या विधानानंतर राज्यातील राजकरण चांगलेच तापले आहे. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यानेच महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगितल्याने ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अशातच खासदार संजय राऊत यांनी तर थेट बोम्मई यांना इशारा दिला आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही, तर धमकी देतो. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
माध्यमांशी बोलतांना संजय राऊत पुढे म्हणाले,’मी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा देत नाही. धमकी देतोय. तुमची बकबक बंद करा. हे घेऊ, ते घेऊ हे थांबवा. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. आमचं सरकार जरी सिलिंडरवर करून गुडघ्यावर बसलं असलं तरी शिवसेना स्वाभिमानाने उभी आहे या महाराष्ट्रात हे विसरू नका’ असं म्हणत राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.