कोलकाता – प्रत्येक हिंदू संपूर्ण जगासाठी आदर्श असेल असा भारत निर्माण करण्याच्या संकल्पाने आपल्याला काम करायचे आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हंटले आहे. कोलकाता येथे ज्येष्ठ प्रचारक केशवराव दीक्षित आणि श्यामल बंदोपाध्याय यांच्या स्मरणार्थ आयोजित स्मरण सभेत ते बोलत होते.
भागवत म्हणाले, दोघेही राष्ट्रहितासाठी पूर्णपणे समर्पित होते. त्यांचे प्रत्येक पाऊल इतरांच्या हितासाठी होते. त्यांना सदैव अमर ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे त्यांनी केलेले कार्य आपण पुढे नेले पाहिजे. त्यांच्या जाण्यानंतर त्यांची स्मृती आणि कार्य दोन्ही आपल्यासाठी प्रेरक आहेत. त्यांच्या आठवणी डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे कार्य पुढे नेणे हे आपले पुढील ध्येय असले पाहिजे. श्रद्धांजली सभेपूर्वी मोहन भागवत कोलकता येथील केशव भवनात पोहोचले, तेथे त्यांनी संघाचे पदाधिकारी व संघटनांशी संघाच्या उपक्रमांबाबत बैठकही घेतली.
मूळचे महाराष्ट्रात जन्मलेले केशवराव दीक्षित यांनी त्यांच्या आयुष्यातील 70 वर्षे संघाचे प्रचारक म्हणून बंगालमध्ये घालवली. 20 सप्टेंबर रोजी कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तसेच श्यामलाल बंदोपाध्याय यांनीही संघाच्या कार्याचा प्रचार-प्रसार करण्याचे काम आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत केले. या दोघांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली सभेत सहभागी होण्यासाठी संघप्रमुख प्रामुख्याने आले होते.
हेही वाचा – ठसका! नो सेल्फी, ओन्ली पुरणपोळी…
युक्रेनच्या नागरिकांचे रशियात सहभागी होण्याचे मत; 4 प्रांत होणार सामील
उत्तर कोरियाच्या किम जोंग यांनी घेतली क्षेपणास्त्र चाचणी; इतर देशांमध्ये तणावाचे वातावरण