मुंबई – सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. हे बेवड्यांचे राज्य आहे असे म्हणणाऱ्या भाजपा पक्षातच दारु पिणारी सर्वाधिक मंडळी आहेत, अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली.
भाजप नेत्यांचे दारू निर्माण करण्याचे कारखाने, वाईन शॉप आहेत तसेच काही केंद्रीय मंत्री, माजी मंत्र्यांचे बार आहेत. भाजपचा दारूला इतका विरोध असेल तर त्यांनी हे परवाने परत करावेत आणि भाजप कार्यकर्त्यांनी दारू पिणार नाही अशी शपथ घ्यावी, अशी मागणी मलिक यांनी केली. यावर आता भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या मेंदूवर हर्बल टोबॅकोचा परिणाम झाल्याने ते अशी वक्तव्य करत असल्याचा टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले भाजपाचे नेते मोहित कंबोज
“हर्बल टोबॅकोचा वापर एखाद्या व्यक्तीने रोज केला, त्यातही सकाळ संध्याकाळी केला तर त्या व्यक्तीच्या मानसिक संतुलनावर परिणाम होतो. ज्या प्रकारचं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलंय ते रोज हर्बल टोबॅको वापरुन झालेल्या परिणामामुळे झालंय”