नवी दिल्ली – या वर्षाच्या अखेरी पर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर 2021 पर्यंत संपुर्ण देशातील लसीकरण पुर्ण करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते ते आश्वासनही पुर्ण करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी सरकारने गेल्या जून महिन्यात सर्वोच्च न्यायालयात देशाचे लसीकरण डिसेंबर पर्यंत पुर्ण केले जाईल असे लेखी आश्वासन दिले आहे.
पण आजही हे आश्वासन पुर्ण होऊ शकलेले नाही असे त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारचे आणखी एक आश्वासन धुळीला मिळाले आहे असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे. आत्तापर्यंत देशातील केवळ 60 कोटी 15 लोकांना लसींचे दोन्ही डोस मिळाले आहेत. त्यामुळे अजून चाळीस टक्के लोकांचे लसीकरण बाकी राहिले आहे. देशातील 84.51 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. म्हणजे अजून सुमारे 16 टक्के लोकांना पहिला डोसही मिळालेला नाही.