मुंबई : मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतापले असून त्यांच्यावर आता पर्यंत तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
तर त्यांना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शिवसैनिकांनी च्या वक्तव्याचा निषेध केला असला तरी भाजपाने मात्र या वक्तव्याबद्दल राणेंना समर्थन दिले असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही राणेंच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले रामदास आठवले
‘राणेंनी ते वक्तव्य केलं. त्यामागे मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा हेतू नाही. ते तर त्यांनी या साठी म्हंटले कारण महाराष्ट्राचा विकास करण्यात राज्य सरकार अपयशी ठऱत आहे. त्यांनी राज्याच्या विकासाकडे लक्ष दयावे. मुख्यमंत्र्यांनी अधिक सक्रिय व्हावं, राज्याचा विकास व्हावा अशीच भावना त्या वक्तव्यामागे आहे.’
नारायण राणे Vs उद्धव ठाकरे संबंधित सर्व बातम्या –
‘मी कोणताही गुन्हा केला नाही; माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही’
“खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर या, तुमची औकात दाखवून देऊ”
शिवसेना ‘ऍक्शन मोड’मध्ये! तुफान दगडफेक करत नाशिकच्या भाजपा कार्यालयाची तोडफोड
नारायण राणे यांच्या अटकेसाठी पुणे पोलीस रवाना; मुख्यमंत्र्यांवरील टीका भोवणार
“नारायण राणे यांचे बाण वर्मी लागलेले दिसतायत”; भाजपच्या ‘या’ आमदाराचे राणेंना समर्थन
‘सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत’
मुंबईत शिवसेना आक्रमक; नारायण राणेंविरोधात ‘कोंबडी चोर’ उल्लेख करत बॅनरबाजी
video – ‘…मी असतो तर कानाखालीच चढवली असती’, राणेंची जीभ घसरली
नाशिक पोलीस आयुक्त राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आहेत का? आमचं पण सरकार ‘वर’ आहे
रामदास आठवले म्हणाले,’मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विकास करावा यासाठी राणेंनी ‘ते’ विधान केले’