मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याचं राजकारण गल्ली ते दिल्ली ढवळून निघालं आहे. भाजपने आक्रमक पावित्रा घेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. हे सगळ घडत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांचं एक ट्विट चर्चेचा विषय ठरलं आहे.
बुरा न मानो..
होली है……… pic.twitter.com/4pqmYKGJoC— Sanjay Raut (@rautsanjay61) March 28, 2021
या ट्विटमध्ये बुरा न मानो.. होली है……… असं कॅप्शन देत संजय राऊत यांनी आपल्या हटके स्टाईलचा वापर केला आहे. त्यांनी एक शेर ट्विट केला आहे. ‘आसमान मे उडने की मनाही नही है…. बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे’, अशा मजकूर त्यामध्ये आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणासाठी आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला होता. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा मोठा आरोप केला होता. त्यावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. यातच राऊत यांचं हे ट्विट आलं आहे.