भोपाळ – देशात कोविडवरील सहा नवीन लसी विकसित होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. एका पर्यावरण संशोधन संस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आज हर्षवर्धन यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की पंतप्रधान मोदी हे नवा भारत घडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारताला विश्व नेता बनवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. लसीवरून देशात सुरू असलेले राजकारण थांबवण्याची गरज आहे असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे की आपण विज्ञानाचा सन्मानच केला पाहिजे. करोना सारख्या साथीचा आपण राजकारणाने नव्हे, तर विज्ञानाने मुकाबला करू शकतो. भारताने त्यासाठीच प्रयत्न सुरू केले असून आज भारतात करोनाच्या आणखी सहा लसी विकसित होत आहेत असे त्यांनी नमूद केले. या क्षेत्रात आपल्या वैज्ञानिकांनी दैदिप्यमान कामगीरी करून साऱ्या जगाला लसीचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे असे ते म्हणाले.