नवी दिल्ली – संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या भारताच्या बहुप्रतिक्षित “चांद्रयान-3’ची पाचवी कक्षा बदलणारी प्रक्रिया मंगळवारी यशस्वीरित्या पार पडली आहे. सध्या “चांद्रयान-3′ पृथ्वीपासून 127609 किमी X 236 किमी अंतराच्या कक्षेत असून पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर 1 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली.
यापूर्वी 20 जुलै रोजी 71351 किमी x 233 किमी अशी कक्षा करण्यात आली होती. आता हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या मध्यरात्री स्लिंग शॉटद्वारे चंद्राच्या दिशेने जाईल. 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. ते 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल.
एकदा यानाने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात प्रवेश केल्यावर, त्याची उंची हळूहळू कमी करण्यासाठी आणि चंद्राभोवती वर्तुळाकार कक्षेत प्रवेश करण्यासाठी कक्षा-कमी करणार्या युक्तीच्या मालिकेतून जाईल.
14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता हे मिशन श्रीहरिकोटा केंद्रातून निघाले आणि जर सर्व काही योजनेनुसार झाले तर ते 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल.