मुंबई – राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल अधिक सक्रिय दिसत आहेत. राज्यपाल आणि सरकार यांच्यातील संघर्ष सामान्य बाब असली तरी गेल्या काही दिवसांत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार संघर्ष चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे विमानातून उतरण्याची राज्यपालांवर आली आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे देहरादूनला जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. परंतु, राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नाही. यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरण्याची वेळ आली. सध्या त्यांनी दुसऱ्या विमानाचे बुकिंग केले आहे. दरम्यान, याबाबतीत मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही.
Maharashtra Guv Bhagat Singh Koshyari was scheduled to go to Dehradun today by a state govt plane However when Governor reached Mumbai Airport, he was told that permission to fly him in that plane has not been given. He has now booked a commercial flight to Dehradun.
— ANI (@ANI) February 11, 2021
दरम्यान, सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दाही चांगलाच पेटला आहे. कारण भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे अजूनही प्रलंबित असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक होत राज्यपालांना थेट न्यायालयात जाण्याचाच इशारा दिला आहे.