मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील सिनेसृष्टी उत्तर प्रदेशात हलवण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा सुरु होती. अशातच आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौरा करत राज्य सरकार युपीमध्ये जागतिक दर्जाची सिनेसृष्टी उभारणार असल्याची अधिकृत घोषणा केली. मुख्यमंत्री योगींनी आज याबाबत अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाल्याचेही सांगितले. दरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेनेने केलेल्या आरोपांवर देखील प्रतिक्रिया दिली.
यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या राज्यातील व्यवसाय दुसऱ्या राज्यात घेऊन जाऊ देणार नाही या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी, “आम्ही येथून काहीही घेऊन जाणार नाही. मुंबईतील सिनेसृष्टी मुंबईमध्ये काम करेल, तर उत्तर प्रदेशात उभारण्यात येणारी सिनेसृष्टी ही नव्या गरजांनुसार उभारण्यात येणार आहे.” असं उत्तर दिलं.
We’re not taking anything anywhere. Mumbai Film City will work in Mumbai itself, new Film City in UP is being developed in a new environment according to new requirements: UP CM on being asked about Maharashtra CM saying that he won’t allow his state’s business to be taken away https://t.co/kSluuRkL4G pic.twitter.com/5OiTdQaTve
— ANI UP (@ANINewsUP) December 2, 2020
शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आम्ही येथे काहीही हिसकावून घेण्यासाठी आलेलो नाही. आम्ही जागतिक दर्जाची सिनेसृष्टी उभारत आहोत. याबाबत कोणी चिंता व्यक्त करण्याची गरजच काय आहे? आम्ही लोकांना जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या फिल्म सिटीच्या स्वरूपात काहीतरी नवं देऊ इच्छितो.”
We’ve not come here to take anything away. We’re building a new Film City. Why one is getting worried about it? We’re giving something new to people in form of world-class infrastructure: UP CM Yogi Adityanath on being asked about Shiv Sena leader Sanjay Raut’s Film City comments https://t.co/2sP3FmIbhe pic.twitter.com/REn2SqEDa4
— ANI (@ANI) December 2, 2020