अहमदनगर- अहमदनगर- दौड महामार्गांवर ट्रक आणि झायलो कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. अहमदनगर-श्रीगोंदा रस्त्यावर झायलो कार आणि ट्रक समोरासमोर आल्याने हा भीषण अपघात झाला.
जुने वर्ष सरत असताना या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात काळाने शेख कुटुंबियांवर घाला घातला. या भीषण अपघातात शेख परिवारातील 13 वर्षाच्या दोघांसह 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शाबाज शेख, गाजी बांगी आणि लुजैन शेख असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
त्याशिवाय, अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी काहींना दौंड तर काहीना श्रीगोंदा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शेख कुटुंबिय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील दर्गाच्या दर्शनासाठी कल्याणवरून आले असल्याची माहिती आहे..या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.