नवी दिल्ली – उत्तराखंडच्या गौरीकुंडमध्ये भूस्खलनात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण बेपत्ता झाले आहेत. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रुद्र-प्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धाम यात्रेच्या मार्गावर शुक्रवारी ही दुर्घटना घडली असून बचाव पथक शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यापैकी 17 लोक नेपाळचे नागरिक आहेत.
उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यात शनिवारी रात्री पावसामुळे घराची भिंत कोसळली. भिंतीखाली दबून दोन मुलांचा मृत्यू झाला. दुसरीकडे नैनितालमध्ये पुलावरून जाणारी बस उलटली. बसमधील 35 जणांना जेसीबीने वाचवण्यात यश आले.
रविवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातही दरड कोसळली. त्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग टी-2 बोगद्याजवळ रोखण्यात आला. तासाभराच्या प्रयत्नानंतर प्रशासनाने ढिगारा हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी बकिया बॅरेजचे 13 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे रेवा येथील तराई भागात पुराचा धोका वाढला आहे. येथे होमगार्ड आणि एसडीईआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तराखंडमध्ये भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोन्ही मुलांना पोलिसांनी रुग्णालयात नेले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. उत्तराखंडमध्ये भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोन्ही मुलांना पोलिसांनी रुग्णालयात नेले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.