नवी मुंबई – राज्यात काही दिवसांपासून एसटीच्या अपघाताची मालिका सुरूच आहे. पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावर एसटीचा भीषण अपघात घडाला आहे. हा अपघात पनवेलमधील तारा गाव ब्रिजवर घडला आहे. मागून आलेल्या एसटी बसने दोन चारचाकी वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई- गोवा महामार्गावर पेणच्या दिशेने जाणाऱ्या दोन वाहनांना एसटीने मागून धडक दिली. हा अपघात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने झाला आहे.
या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातग्रस्त वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणात एसटी बस चालक तात्या पवळ यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.