पिंपरी (प्रतिनिधी) – जमावबंदी आदेश असतानाही सामुदायिक नमन पठण करण्यात आले. याप्रकरणी चिखली पोलिसांनी १३ जणांना अटक केली. तसेच इतर २० ते २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समिना सराईतुल्ला वारीसअली चौधरी, अकबाल हाकीबुल्ला खान (वर्षे ५२), सलीम झीनत चौधरी (वय ३२), मंहमद शकील महमद खलील चौधरी (वय ४६),
कमल हयातुल्ला रहमाणी (वय ४८), शमशुद्दीन महमद इलाके खान (वय ४५), नशीबउल्ला मंहमद जमा (वय ५८), अफजल अमीरउल्ला चौधरी (वय ३७), अहमद हुसेन समीउल्ला चौधरी (वय २८), मोहमद साकीर समीना सराईतुल्ला चौधरी (वय १८), बिलाल महमद शकील चौधरी (वय २०), सोएल मंहमद शकील चौधरी (वय २१, सर्व रा. संगम हाईटस, कुदळवाडी चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच पळुन गेलेल्या इतर २० ते २५ जणांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्यांना जामिनावर सोडून देण्यात आले आहे. चिखली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संतोष सकपाळ यांनी याबाबत शुक्रवारी (दि. २७) फिर्याद दिली आहे. करोना या साथीच्या आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने जमावबंदी तसेच संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचा भंग करीत शुक्रवारी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास सुमारे ३५ ते ४० जण चिखली-कुदळवाडी परिसरात असलेल्या एका इमारतीच्या टेरेसवर नमाज पठण करण्यासाठी जमले होते. याबाबतची माहिती मिळाल्यावर चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करत १३ जणांना अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका केली. याबाबत अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.