चार कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश
सातारा – सातारा पालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. प्रशासकीय कामाच्या सोयीचे कारण देऊन पालिकेतल्या चार कर्मचाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी हे आदेश जारी केल्यानंतर आस्थापना विभागाकडून बदलीच्या नोटीसा बजावण्यात आल्या.
प्राप्त माहितीनुसार गेल्या चार वर्षात राज्य संवर्ग प्रवर्गातून झालल्या भरतीमध्ये रिक्त पदांचा वीस टक्के कोटा भरला गेला. तरी निवृत्तीमुळे सुमारे तेवीस टक्के पदे रिकामी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थावर जिंदगी, जन्म मृत्यू, भांडार, वसुली, वृक्ष विभाग, लेखा, बारनिशी या विभागात कामाची कर्मचारी कमी असल्याने कामाची प्रचंड ओढाताण सुरू आहे. त्यामुळे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी मंगळवारी चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या.
आस्थापना विभागातून या बदल्यांना दुजोरा देण्यात आला. या बदल्या प्रशासकीय सोयीनुसार करण्यात आल्याचे आस्थापना प्रमुख अरविंद दामले यांनी सांगितले. श्रीकांत गोडसे यांची शहर विकासमधून सभा कामकाज लिपिक, राजेश भोसले यांची वाहतूकमधून वसुली, प्रभाकर वागडोळे यांची लेखामधून वसुली व तुकाराम गायकवाड यांची सभा कामकाजमधून स्थावर जिंदगी विभागात बदली करण्यात आली आहे. या बदलीच्या नोटीसा कर्मचाऱ्यांना बजावण्यात आल्या असून अद्याप कर्मचारी संबधित ठिकाणी हजर झालेले नाहीत.