Team India leaves for Mumbai for Semi Finals : भारतीय संघाने शेवटच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सचा 160 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सर्व गट सामने जिंकले. भारतीय संघ 9 सामन्यांत 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आता बाद फेरीचे सामने सुरू होतील. पहिल्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला न्यूझीलंडचे आव्हान असेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 15 नोव्हेंबरला होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
भारतीय संघ बंगळुरूहून मुंबईला रवाना…
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनल खेळण्यासाठी भारतीय संघ बंगळुरूहून मुंबईला रवाना झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय संघाचे खेळाडू बेंगळुरू विमानतळावर असून ते मुंबईला रवाना होण्याच्या तयारीत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील खेळाडूंव्यतिरिक्त प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफ दिसत आहेत.
Team India leaves for Mumbai for the massive Semi Finals against New Zealand.pic.twitter.com/t1n7QAzIO1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 13, 2023
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार पहिला उपांत्य सामना…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर 16 नोव्हेंबरला दोन्ही संघ आमनेसामने येतील. त्याच वेळी, विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. भारताशिवाय दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरले.
भारतीय संघाने आपले सर्व गट(साखळी फेरी) सामने जिंकले हे विशेष. भारतीय संघ 9 सामन्यांत 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. याचबरोबर दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे संघ आहेत.