शेतकऱ्यांवर आता पुन्हा दुबार पेरणीचे संकट..
शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील न्हावरे, मलठण व टाकळी हाजी भागामध्ये पेरणी केलेले बाजरीचे पायोनियर कंपनीचे बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकरी वर्गातून येत असून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा दुबार पेरणी बरोबर आर्थिक , शारीरिक कष्ट नुकसानीस सामोरे जावे लागल्याने आता कोरोनाव्हायरस, लॉक डाऊन आणि निकृष्ट बियाणे यामुळे शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे.
निकृष्ट दर्जाचे बियाणे देणारे पायोनियर कंपनीवर कारवाई होणार का? खरीप हंगामाच्या बैठकीत जिल्ह्याच्या नेत्यांनी निकृष्ट दर्जाचे बियाणे देण्याऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. हा शब्द जिल्ह्याचे नेते पाळणार का? शिरूर तालुक्यातील पेरणी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोण देणार, शासन का की कंपनी व्यवस्थापन? याबाबत साशंकता आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1248396302166739/
शिरूर तालुक्यात यंदाच्या वेळेस चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लवकरच खरीपाच्या पेरण्या सुरू केल्या यामध्ये शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी , मलठण, न्हावरे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पायोनियर कंपनीच्या बाजरीच्या बियांनाची पेरणी केली होती. परंतु पेरणीनंतर पंधरा दिवस झाले तरी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पीक उगवण झाली नसल्याचे दिसून आले आहे,याबाबत शेतकऱ्यांनी बियाणे देणारे डीलर दुकानदार यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.
एक एकरावर बाजरी ते पिकाची पेरणी करायची असेल तर जवळपास साडेचार ते साडेपाच हजार रुपये खर्च येत असतो त्याबरोबर त्याचे कष्ट ही असते. जवळपास शिरूर तालुक्यात हजारो हेक्टर वर बाजरीची पेरणी केली आहे. यामुळे अगोदरच कोरोनाव्हायरस लॉक डाऊन मुळे अडचणीत सापडलेला शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला आहे.
शिरूर तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र 21 हजार 913 हेक्टर असून मागील वर्षी 2019 मध्ये ते 19 हजार हेक्टरवर बाजरीच्या पेरण्या झाल्या होत्या यंदा आणखी एक पेरण्या सुरू असून या संख्येच्या आसपास पेरणीचा आकडा येणार आहे. शिरूर तालुक्यातील जवळ सर्व भागात बाजरीची पीक घेतले जात असून अडीच महिन्यात येणारे हे नगदी पीक शेतकऱ्याची वार्षिक आर्थिक घडी बसवण्यासाठी साथ देणारे असते.
“बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विविध कंपनीच्या बाजरीच्या बियांन्यायाने नमुने शिरूर पंचायत समिती कृषी विभागाकडून काढले जातात हे बियाणे प्रयोगशाळेत तपासणी पाठवले आहे. याचा तपासणी अहवाल जर उगवणे बाबत अप्रमाणित आला तर त्या कंपनीवर न्यायालयीन दावा दाखल करण्यात येत असतो.
-निलेश बुधवंत ( कृषी अधिकारी, शिरूर पंचायत समिती)
शेतकऱ्यांनी जर आपल्या शेतात बाजरी पेरणी करूनही ही तिची उगवण झाली नसेल तर याबाबत डीलर यांना सांगण्यापेक्षा डायरेक्ट पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणे गरजेचे आहे. तसेच या तक्रारी डीलर कडे केल्यानंतर कंपनी अधिकारी येऊन आपली सावरासावर करत असतील तर याबाबत शेतकऱ्यांनी सावध होणे गरजेचे आहे. बाजरी पेरणी उगवण्याचे दिवस आणि त्यानंतर लोटणारा काही काळ हा महत्त्वाचा असतो. या काळात पिकाची उगवण झाली नसेल तर तात्काळ तक्रार करणे गरजेचे आहे.
“7 जून रोजी टाकळीहाजी येथे ते शेतीची व्यवस्थित मशागत करून पायनर कंपनीचे बाजरी बियाणे तीन एकरात पेरणी केली होती ती वेळेत पाऊस झाल्याने यावेळी चांगले पीक येईल असे वाटत असताना मात्र या वेळेस बाजरीची उगवण झाली नाही ही त्या मुळे निकृष्ट दर्जाचे बियाणे मिळाले आहे. यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याला नुसकान भरपाई लवकरात लवकर शासनाने द्यावी.
-शांताराम उचाले (शेतकरी, टाकळीहाजी)
कंपनी व्यवस्थापनाच्या मोहात शेतकऱ्यांनी सापडू नये कारण हे कंपनी व्यवस्थापन शेतकऱ्यांना गोलमाल करून तो काळ संपवण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर कंपनी व्यवस्थापन हात वर करतील मग शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या भागात ज्या कंपनीचे बाजरी बियाणे पेरले उगवले नसेल तर त्याची तक्रार पंचायत समितीकडे त्वरित करणे गरजेचे आहे.
आजपर्यंत शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेते डीलर यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत या तक्रारी तोंडी चालत नसून त्यासाठी लेखी तक्रारी शिरूर पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करणे गरजेचे आहे.
जर बाजरी बियाणे उगवले नसेल तर याबाबत लेखी तक्रारी शिरूर पंचायत समिती कृषी विभागाकडे करावी ही तक्रार आल्यानंतर तालुकास्तरीय तक्रार समिती अध्यक्ष उपविभागीय कृषी अधिकारी खेड व सदस्य सचिव शिरूर पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्या समितीकडून तत्काळ शेतकऱ्याच्या क्षेत्रावर जाऊन पहानी करून त्याचा अहवाल शेतकऱ्याला दिला जातो.
“पायोनियर कंपनीचे बियाणे उत्कृष्ट दर्जाची असून, शिरूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी बाजरीच्या बियाण्याची लवकर पेरणी केली त्यामुळे जमिनीतील धूप बियांना लागून ते जळाली असतील, किंवा नऊ दहा 11 ,12, 13 जून रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला जवळ 60 मिमी जास्त पाऊस झाला जास्त पाण्यामुळे ही बियाणे दबले गेले आहे. यात बियाण्यांची, कंपनीचा, शेतकरी याकोणाचा दोष नाही. तरीही याबाबत कंपनीचे काही लोक याबाबत तालुक्यात तपासणी करीत आहेत.
-सागर पांडे (एरिया सेल्स मॅनेजर, पायोनियर कंपनी)
शिरुर तालूक्यात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले पायोनिअर बाजरीचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असून कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे यांनी केली आहे.