नवी दिल्ली –त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅंड या ईशान्येकडील तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या (गुरूवार) जाहीर होणार आहेत. नववर्षातील पहिलाच राजकीय रणसंग्राम असल्याने त्या निवडणुकांच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल.
निवडणुकांना सामोऱ्या गेलेल्या तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. तिन्ही राज्यांपैकी त्रिपुराच्या निकालाला सर्वांधिक महत्व असेल. त्याचे कारण म्हणजे त्रिपुराच्या सत्तेसाठी प्रमुख लढत राष्ट्रीय पक्षांमध्ये होणार आहे.
त्या राज्यातील सत्तारूढ भाजपपुढे तगडे आव्हान उभे करण्यासाठी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी हातमिळवणी केली. त्रिपुरात तिप्रा मोथा या पक्षानेही यावेळी स्वत:ची मोठी हवा निर्माण केली. त्यामुळे तेथील लढतीला तिरंगी स्वरूप प्राप्त झाले आहे.