मुंबई – राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस समीकरण सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला. सर्वाधिक जागा मिळूनही विरोधी पक्षात असणारे देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शपथविधीनंतर महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर टीकास्त्र सोडले होते. आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी? या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? स्वत:च्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का?
नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी?
स्वतच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का?
अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2019
तसेच भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकासआघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का?
महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2019