मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या शेवट झाल्यानंतर गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाले. शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री ठरले आहेत. यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विट करत अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला आहे.
हम शतरंज में कुछ ऐसा कमाल करते हैं
कि बस पैदल ही राजा को मात करते हैं— Sanjay Raut (@rautsanjay61) November 29, 2019
संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की,“हम शतरंज में कुछ ऐसा कमाल करते हैं, कि बस पैदल ही राजा को मात करते हैं” हा शेर संजय राऊत यांनी शेअर केला आहे. दरम्यान, राऊत यांनी रोज सकाळी पत्रकार परिषद घेणं बंद केल असल तरी ट्विटरच्या माध्यमातून शेर पोस्ट करण्याची मालिका मात्र सुरुच ठेवली आहे.