राजेंद्र वाघमारे
नेवासा – नेवासा फाटा येथील आठवडे बाजारातून चक्क चोरट्यांनी पोलीस उपनिरिक्षकांच्या खिशात हात घालून मोबाईलची चोरी केल्यामुळे जर पोलीसांच्या चोऱ्या होणार असतील ? तर पोलीस खाते सर्वसांमान्यांच्या चोऱ्या खरच रोखू शकतील काय ? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधिक्षकांनाच पोलीसांच्या चोऱ्या रोखण्याचे आव्हाण चोरट्यांनी दिले आहे.
नेवासा फाटा येथील दर गुरुवारच्या आठवडी बाजारातून मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत याबाबत अनेकांनी बाजारातील चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे केलेली होती माञ पोलीसांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वकिल, डॉक्टर,माजी सरपंच व नागरीकांचे अनेकदा मोबाईल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचे हेरुन चक्क बाजार करतांना पोलीस उपनिरिक्षकांच्या मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारुन खुले आव्हाण पोलीसांना दिले आहे त्यामुळे पोलीसांच्याही आता चोऱ्या होवू लागल्यामुळे सर्वसामान्यांच्या चोऱ्या पोलीस रोखू शकतील काय ? असा सवालही यानिमित्ताने समोर येतांना दिसत आहे.
सद् रक्षणाय..खलनिग्रहणाय…बिद्र वाक्य घेवून जनतेच्या रक्षणासाठी वर्षातील ३६५ दिवस अविरत सेवा बजावणाऱ्या गृहखात्यामुळे सर्वसामान्य जनता सुखी रहात आहे माञ नेवासा येथे चक्क पोलीसांच्या चोऱ्या होवू लागल्यामुळे गृहखात्याचा धाक अन् दरारा संपुष्ठात येवू लागला असल्याचे पोलीसांच्या चोऱ्यांवरुन सिद्ध होतांना दिसून येवू लागले आहे त्यामुळे गुन्हेरांवर पोलीसांचा वचक असण्यापेक्षा पोलीसांवरच चोरांचा दबाब निर्माण झाला की काय असा उपरोधक असा सुज्ञ नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.