मुंबई – पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूलीमध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत ? वसूलीचे हिस्सेदार ,वाटेकरी ,कोण कोण नेते आणी पक्ष आहेत ? हे समोर येईल. अन अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेलमध्ये जावे लागेलच.
ते पुढे म्हणाले, ही लढाई कोणा एका व्यक्ति विशेषच्या विरोधातील नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. कल्पना करा. महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून 100 कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? अन सर्व खाती मोजली तर किती कोटी? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?” अशा शब्दात राम कदम यांनी टीकेची झोड उठवली आहे.
काय आहे राम कदम यांचे ट्विट
पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर .आता दर महिन्याला 100 कोटी रुपये #वसूली मध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत ? वसूलीचे हिस्सेदार ,वाटेकरी ,कोण कोण नेते आणी पक्ष आहेत ? हे समोर येईल. अन अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेल मध्ये जावे लागेलच. ही लढाई कोणा एका व्यक्ति
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 2, 2021
तत्पूर्वी, गेल्या बऱ्याच काळापासून नॉट रिचेबल असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले होते. त्यांनी आपला जबाब ईडीसमोर नोंदवला. तब्बल 13 तास त्यांची चौकशी सुरु होती. अखेर चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नव्हते. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती. अशातच आज अनिल देशमुख स्वतः ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले.