मुंबई – दादर माहिम, प्रभादेवी हे सुसंस्कृत मतदारसंघ आहेत. अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे बिहारी राज्य नाही. पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी आणि जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
संदीप देशपांडे म्हणाले, शिवसेनेने जे अडीच वर्षांत पेरले, ते आता उगवत आहे. तुम्ही अडीच वर्षांत लोकांवर खोट्या केसेस टाकल्या. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर आणि संतोष धुरीवर खोटी केस टाकली की महिला कॉन्स्टेबलला धक्का दिला म्हणून. ती महिला कॉन्स्टेबल आता आहे कुठे? त्यांचे स्टेटमेंट नाही, काही नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.