लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशभर तयार झालेल्या वातावरणात जीवनाचा खरा आनंद घ्यायचा राहूनच गेला, असेच वाटते. घड्याळाच्या काट्याप्रमाणे फक्त पळत राहिलो. नोकरी, व्यवसायानिमित्त दिवस उगवल्यापासून रात्री उशिरापर्यंत राबत होतो. पण, एका करोना नावाचे विषाणूने संपूर्ण जग थांबविले आणि सक्तीचा आराम दिला. सर्वजण आता घरातच क्वारंटाईन आहेत. आपल्याच कुटुंबासमवेत वेळ घालवत आहोत. पालकांनाही मुलांना वेळ देता येतोय. विशेष म्हणजे या काळात अनेकजण स्वत:ची कामे स्वत: करायला शिकले.
कोणत्याही भौतिक गोष्टीची आपल्याला गरजच नाही, याचीही जाणीव झाली. जीवनाकडे सकारात्मकच पाहिले पाहिजे. एकमेकांना मदत केली पाहिजे. समाधानाने जगता आले पाहिजे, याचे धडे मिळाले. भविष्यातही करोनासारख्या महामारीचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे त्याच्यासोबत कसे जगायचे, हे शिकून घ्यावेच लागेल. विनाकारण अफवांवर विश्वास ठेवता कामा नये. मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सचा नियम कायमस्वरुपी पाळवा. करोना संपल्यानंतरही ही सवयच करुन घ्यावीच लागेल. सर्वात महत्वाचे अशा संकटकाळात जीव धोक्यात घालून समाजाला जपणाऱ्या डॉक्टर्स, सफाई कर्मचारी, पत्रकार व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वच घटकांचे आभार मानायला हवेत. त्यांना सहकार्य करायला हवे. सर्वांनी नियम पाळल्यास करोनावर सहजपणे मात करता येऊ शकते.
भारती रंगनाथ भगत
माध्यमिक शिक्षिका, लोयोला स्कुल, पुणे
संपर्क : 9766167632
भारत 2020पर्यंत महासत्ता होईल, हे स्वप्न दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पाहिले होते. आज एकविसावे शतक सुरु झाले आहे. एकविसावे शतक भारताचे असावे, यासाठी माझ्यासारखे तरुण उतावीळ आहेत. एकंदरीत महासत्तेची ही स्पर्धा कथित प्रगत राष्ट्रांमध्ये अत्यंत वेगाने चालू होती. राष्ट्रवादाच्या नावाखाली हे प्रगत देश भूमातेच्या संहार करत होते. ऍमेझॉनचे जळालेले जंगल, अमेरीकेची पर्यावरण विषयक करारांमधून माघार, चीनची घुसखोरी, टोकाची धर्मांधता, अशा विपरित गोष्टींतून प्रत्येक देशाचा विकास साकारणार होता. या बेफाम वेगाला आता निसर्गानेच थांबविले. करोनासारख्या विषाणूने संहारक विकासाचा रथच थोपविला आहे. डिजिटल दुनियेत जगणारी लोक आता खऱ्या आनंदाची व्याख्या शोधू लागले. भरकटलेल्या तरुणाईला “स्व’ शोधायला एकांत मिळाला. आई-वडिलांशी बोथट झालेल्या संवादाने पुन्हा नवीन मातीत मिसळायला शिकला. करोनाच्या माध्यमातून निसर्गाने दिलेला हा धडा सामाजिक आणि अर्थिक पटलावर खूप मोठा बदल घेऊन येईल, हे नक्की!
तेजस सुरेश थोरात ,बारादरी, ता. नगर । संपर्क : 9356798861