मुंबई – बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असा खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वातावरण अधिकच तापताना पाहायला मिळत आहे. तसेच पाटील यांच्या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे.
दरम्यान, यावरच आता मनसे अध्यक्ष्य राज ठाकरेंनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी ट्विटर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांचा दावा मनसेने खोडून काढला आहे.
“अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी हा प्रसंग जरूर ऐकावा.!” असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
व्हिडिओत राज ठाकरे म्हणतात की….
अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी सन्मा. राजसाहेबांनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा ! pic.twitter.com/6AwTnGRdo2
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 11, 2023
“मला तोही प्रसंग आठवतो ज्यावेळी मी खोलीत खाली बसलो होतो. त्यावेळी बाबरी मशिद पडली होती. दुपारची वेळ होती. दिड दोन तासांनी बाळासाहेब ठाकरेंना फोन आला. त्यांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला की, येथे कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. पण भाजपचे सुंदलाल भंडारी म्हणत आहेत की,
ही गोष्ट भाजप किंवा भाजपच्या लोकांनी केली नाही. कदाचित ती शिवसैनिकांनी केली असेल. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले की, ही गोष्ट जर शिवसैनिकांनी केली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. त्यावेळी, त्या क्षणाला एक जबाबदारी अंगावर घेणे ही किती महत्वाची गोष्ट होती’. असं राज ठाकरे व्हिडिओत म्हणाले.