नगर – अयोध्येत वादग्रस्त वास्तू पाडल्याच्या आरोपावरुन दाखल गुन्ह्यात सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते निर्दोष असलेल्या निकालाचे नगरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. माजी मंत्री दिलीप गांधी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यानिमित्त फटाके फोडून जल्लोष केला.
राम मंदिरासाठी गेल्या 27 वर्षापासूनचा संघर्ष आता पूर्णत: संपुष्टात आल्याची भावना माजी मंत्री दिलीप गांधी यांनी व्यक्त केली.
आजचा निकाल प्रभूरामचंद्र यांच्यावरील श्रद्धेचा विजय आहे. ज्यांनी ज्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन कार्य केले, त्या सर्वच नेत्यांचे व कारसेकांचे अभिनंदन करत आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री गांधी यांनी केले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी जय श्रीरामचा जयघोष केला. तसेच यावेळी लाडू वाटण्यात आले.
विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष नवनीत सुरपुरिया, नूरमहंमद सय्यद, संतोष सावळे, अविनाश साखला, नितीन जोशी, लक्ष्मिकांत तिवारी, रोशन गांधी, केदार लाहोटी, युवराज नवसारीकर, मल्हारी दराडे, लक्ष्मन बोठे, बाळासाहेब पोटधन आदी यावेळी उपस्थित होते.