मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटककडून ज्या हिंसक घटना घडल्या आहेत त्या केंद्र सरकारच्या पाठिंब्याशिवाय घडणे अशक्य आहे असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. कर्नाटकच्या या आक्रमक हल्ल्याला तोंड देण्यास राज्यातील शिंदे सरकार कमकुवत ठरले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
जगातली सर्वात मोठी व सर्वात नकारात्मक पार्टी पराभूत झाली – मनीष सिसोदिया
दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांशी फोनवर संपर्क साधून स्थिती निवळण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पण तरीही कर्नाटकातील एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक, शाई टाकणे असे प्रकार केले आहेत. महाराष्ट्रातील मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ बेळगावला भेट देणार होते पण कर्नाटकच्या विरोधानंतर त्यांची ही भेटही बारगळली आहे.
जगातली सर्वात मोठी व सर्वात नकारात्मक पार्टी पराभूत झाली – मनीष सिसोदिया
कर्नाटकच्या हद्दीत महाराष्ट्राच्या वाहनांवर जे हल्ले होत आहेत ते दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाहीत असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मराठीचा कणा मोडून स्वाभिमान संपवण्याचा खेळ सुरू झाला आहे. बेळगावीतील हल्ले त्याच कटाचा भाग आहेत. उठा मराठे उठा! असे राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की त्यांनी क्रांती घडवली आहे, या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी राज्य कसे कमकुवत आहे हे पाहिल्यास ही कोणत्या प्रकारची क्रांती आहे,असा सवाल राऊत यांनी केला आहे.
बेळगावला केंद्रशासित प्रदेश घोषित करा अशी मागणीही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लोक बेळगावला जाण्यास तयार आहेत, असे ते म्हणाले. केंद्रात भाजपचे सरकार आहे, कर्नाटकात आणि महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आहे असे असतानाही हे नेमके सध्या काय चालू आहे हे आम्हालाही कळेनासे झाले आहे असेही राऊत यांनी म्हटले आहे.