Lok Sabha Election 2024 । महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरलाय.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीनंतर राजकारण चांगलंच तापलंय. या मुलाखतीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असे म्हटले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रतिउत्तर दिले आहे. यावर आता संजय राऊत यांनी मोदी-शाहांची रणनीती म्हणत खोचक टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत…
‘उद्धव ठाकरे यांनी जे सागंतिले ते शंभर टक्के सत्य आहे. उद्धव ठाकरेंशी फडणवीसांची चर्चा झाली तेव्हा आमचे संबंध चांगले होते. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मी दिल्लीत जाऊन मी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधान होईल, असे त्यांचे स्वप्न होते. स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही.
ते पुढे म्हणाले,’इतके मोठे स्वप्न फडणवीस पाहायला लागल्यानंतर मोदी-शाहांनी निर्णय घेऊन एकनाथ शिंदे या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली त्यांना काम करायला लावले. यालाच मोदी-शाहांची रणनीती म्हणतात’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.’
हे वाचले का उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस; म्हणाले आधी अमित शाह, पंतप्रधान मोदींवर कारवाई…