Uddhav Thackeray| लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया काल पार पडली. तर अनेक भागात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत. यात अनेक सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप केले जात आहे. यातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील, असं विधान केले आहे.
“पंतप्रधान पदाच्या या शर्यतीत संजय राऊतांनी उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत?, असा सवाल उपस्थित केला. उध्दव ठाकरे यांच्या पंतप्रधानपदाचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल. पंतप्रधानपदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली, तर शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व नेते पाठिंबा देतील. पंतप्रधान पदाचा महाराष्ट्राला का मान मिळू नये? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही शरद पवार हे पंतप्रधान होतील याची वाट बघत होतो, पण शरद पवार यांचे कर्तृत्व असताना त्यांना हे पद मिळाले नाही,” असेही संजय राऊत म्हणाले. Uddhav Thackeray|
“अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही”
देशात इंडिया आघाडीच्या 300 पेक्षा जास्त जागा निवडून येतील, तर राज्यात महाविकास आघाडीला 35 पेक्षा अधिक जागा मिळतील. तर अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही, भविष्यात ते भाजपात विलीन होतील. तसेच बारामतीमधून सुप्रिया सुळे या बहुमताने निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. Uddhav Thackeray|
माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी यावेळी विशाल पाटील यांच्यावर देखील भाष्य केलं. विशाल पाटील हे समजुतदार आहेत. विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत. उद्धव ठाकरेंच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे.विशाल पाटलांच्या मनात देखील शिवसेनेबद्दल प्रेम आहे, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा:
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते,’आदित्यला मुख्यमंत्री म्हणून तयार करून दिल्लीला जाईन…’