नवी दिल्ली – देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. सुषमा स्वराज एक उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्ती होत्या. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर सुषमा स्वराज यांना भाजपचे सर्वात प्रभावी वक्ता मानले जात होते. देश-विदेशातील त्यांची भाषणे इतिहासात नमूद केली आहेत. पाहा अशीच सुषमा स्वराज यांची काही ऐतिहासिक भाषणे