मुंबई :– महाविकास आघाडी सरकारला काल तीन वर्षे झाली असती. या काळात आम्ही कोट्यावधींचे प्रकल्प आणले. मात्र आज त्याचं श्रेय दुसरेच लाटत आहेत. हे खोके सरकार नको त्या गोष्टींच्या मागे धावत आहे. वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार होता. मात्र, कमी विकसित क्षेत्रात तो गेला. त्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री खोटे बोलले, असा दावा करत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केले आहे.
Today we exposed the unconstitutional govt’s lie that semiconductor project wasn’t coming to our State.
Here’s a copy of the letter from @midc_india to the project proponent seeking time for MoU signing.
If it had gone away, then why this letter?
Will the CM debate with me? https://t.co/4SxtXHdrbQ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 29, 2022
मुंबई येथे आयोजीत पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल अग्रवाल यांना लिहिलेले पत्र दाखवले. आदित्य ठाकरे म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन आज गुजरातमध्ये गेला आहे. तो गुजरातमध्ये गेला याचं वाईट वाटत नाही. मात्र येथील लोखो लोकांचा रोजगार गेला. त्याबद्दल कोणीच बोलत नाही. या मुद्यावर आमचा दावा खोटा आहे, असा आरोप झाला. तो महाविकास आघाडीच्या काळातच राज्याबाहेर गेला असा आरोप झाला. यावर आम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज केला. ज्याला दीड महिन्यांनी उत्तर आले आहे. त्याचा पुरावाच मी आणला आहे, असे ते म्हणाले.
हे पत्र 5 सप्टेंबर 2022चे आहे. हे तत्कालीन एमआयडीसीच्या सीईओंनी लिहिले आहे. हे वेदांत फॉक्सकॉनचे चेअरमन अनिल अगरवाल यांना पाठवले होते. याचा विषय होता राज्य सरकार आणि वेदांतमध्ये एमओयू करण्यासंदर्भातला. तिथपर्यंत एखादा व्यवहार येतो, त्याचा अर्थ सर्व ठरले असा असतो. फक्त कॅबिनेटची मंजुरी बाकी असते. पण हे खोके सरकार खोटे सरकार आहे. याआधीही या पत्राचा उल्लेख मी केला होता. पण माझ्या हातात हे पत्र नव्हते. मला हे खोके सरकारमध्ये आमचे काही नाईलाजाने बसलेल्या लोकांनी सांगितले होते की अमुक एमओयूचे पत्र गेले होते, असा दावा आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.
एकतर 26 जुलैला मंत्रालयात बैठक झाली होती. पण 29 ऑगस्ट 2022 रोजी देवेंद्र फडणवीसांसोबत झालेली बैठक नेमकी कशासाठी होती? वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प या राज्यात ठेवण्यासाठी होती की दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी होती. या बैठकीबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती होते का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.