नवी दिल्ली: उत्तरप्रदेशातील भाजप सरकारला केवळ जाहीराती करण्यापुरतीच शेतकऱ्यांची आठवण होताना सध्या दिसत आहे अशी टीका कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे.
उत्तरप्रदेशातील महोबा आणि हमीरपुर येथील दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना नुकत्याच उघडकीला आल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली आहे. उत्तरप्रदेशातील सरकारने शेतकऱ्यांची छळ करण्याच्या नव्या कल्पना आखल्या आहेत.
त्यांनी कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली असून वीज बील माफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना तुरूंगात टाकले जात आहे. पूर आणि पावसामुळे ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांना कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही असा आरोप त्यांनी ट्विटवर केला आहे.
सर्वच बाजूने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा सरकारला विसर पडला आहे. केवळ जाहींरातींपुरताच या सरकारला शेतकऱ्यांची आठवण होताना दिसत आहे असा टोमणाहीं त्यांनी मारला आहे.