चंद्रकांत पाटील यांचा आत्मविश्वास
मुंबई: येत्या 21 ऑक्टोबर नंतर शरद पवारांना राजकारण आणि समाजकारणातून कायमचे निवृत्त करू असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरी मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश अबिटकर यांच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी हा दावा केला.
निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार निवृत्त झालेले असतील असे ते म्हणाले. भाजप-शिवसेना युतीने शरद पवारांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीका करण्याचे निवडणूक धोरण निश्चीत केले आहे. त्याच आधारावर चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर यावेळी टीकेची झोड उठवली.
ते म्हणाले की कॉंग्रेस-एनसीपी आघाडीने कोथरूड मधून माझ्या विरोधात प्रबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणताहीं प्रबळ दावेदार सापडला नाहीं त्यामुळे दुसऱ्याच पक्षाला पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यामुळे आपण कोथरूड मधून आरामात निवडून येऊ असा दावाही पाटील यांनी यावेळी केला.