लखनौ – उत्तर प्रदेशातल जौनपूर आणि मल्हानी विधानसभा क्षेत्रातील संवेदनशील मतदान केंद्रांवर जादा सुरक्षा दले तैनात करण्याची मागणी समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
निवडणूक आयोगाला पाठवलेल्या निवेदनात समाजवादी पक्षाने म्हटले आहे की, गेल्या निवडणुकीत काही विशिष्ट गटाच्या लोकांनी मतदान केंद्रे बळकाऊन मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्याच्या घटना घडल्या होत्या. या निवडणूक बूथमध्ये गरीब, मागासवर्गीय लोकांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
तेव्हापासून या ठिकाणच्या मतदारांमध्ये मतदानाविषयी भीती आणि साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ते दूर करण्यासाठी येथे जादा सुरक्षा दले नेमण्याची गरज आहे. येथील निवडणूक अधिकारीही पक्षपाती भूमिका घेत असल्याची त्यांची तक्रार आहे. बदाऊँ पोलीस अधिक्षकांच्या विरोधातही समाजवादी पक्षाने पक्षपातीपणाची तक्रार केली आहे.