कुशीनगर – उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी अनेक “दल'(पक्ष) रिंगणात उतरले आहेत. या सर्व “दल’ची निवडणुकीच्या निकालानंतर “दलदल’ होऊन जाईल. या दलदलीतूनच भाजपचे कमळ उगवेल, असे भाकीत उत्तर प्रदेशातील उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी वर्तवले आहे.
उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी 300 जागा जिंकून भाजप विजयी होईल, असा अंदाजही मौर्य यांनी व्यक्त केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात बहुतेक सर्व पक्ष एकवटले होते.
आता हे सर्व पक्ष भाजपविरोधात एकएकटे लढत आहेत. उत्तर प्रदेशातील हवा बदलते आहे, असे विरोधकांनी 2014 आणि 2019 मध्येही म्हटले होते. मात्र, निकाल लागल्यावर त्यांच्या शिडातील हवाच निघून गेली होती, असे मौर्य म्हणाले.