Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे बळीराजाचे मोठं नुकसान झाले आहे. त्यातच राज्यात (Maharashtra Weather Update) पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदा पावसाच्या कमतरतेमुळे दुष्काळाच्या झळा अगोदरच राज्याला सोसाव्या लागणार आहेत. त्यात आता अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा जोर दिसेल,असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पाऊस पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, आज मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यवतमाळ वगळता आज कुठेही राज्यात गारपिटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली नाही . तर दुसरीकडे, राज्यात पुढील दोन तीन दिवस ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. त्यानंतर राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील अवकाळी पावसामुळे बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीने रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर अस्मानी संकट कोसळणार आहे. अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे.