इस्लामपूर – सुरवातीला करोनाची लागण नसणारे हे बाळ करोनाबाधित आईवडीलांच्या संपर्कात आल्याने त्यालादेखील करोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्याचे आईवडील करोनामुक्त झाले होते. परंतु, आईवडीलांनी बाळासोबत आयसोलेशन वार्डमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला होता. बाळाचा आयसोलेशन वार्डमधील 14 दिवसांचा कालावधी संपल्याने बाळासह आईवडीलांची पुन्हा तपासणी करण्यात आली.
यावेळी तिघांचे देखील अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता करोनामुक्त झालेल्या 25 जणांचे मिरजेत संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता आयसोलेशन वार्डमध्ये केवळ एक महिला करोनाबाधित आहे. दरम्यान, मूळ रेठरे धरण येथील व सध्या मुंबईत वास्तव्यास असलेली एक व्यक्ती रेठरे धरण येथे गावी येऊन राहून गेली होती. ती व्यक्ती मुंबईत परतल्यानंतर तिला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या रेठरे धरण 24 आणि इस्लामपूर येथील 6 अशा 30 जणांना तत्काळ मिरजेतील करोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या सर्वांचा अहवालदेखील निगेटिव्ह आला आहे. तसेच