कोलकता, -विरोधी पक्षांच्या आघाडीला (इंडिया) हादरा देत पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल पक्षाने कॉंग्रेसला जबाबदार धरले. आता ममतांचे भाचे असणारे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीही कॉंग्रेसवर खापर फोडले आहे.
आघाडीचा विचार करता सर्वप्रथम जागावाटप निश्चित करायला हवे. त्यासाठी आम्ही जवळपास सात महिने प्रतीक्षा केली. मात्र, कॉंग्रेस पक्ष स्वस्थ बसून राहिला अन् पुढचे काहीच घडले नाही. कॉंग्रेस नेत्यांशी आम्ही अनेकदा चर्चा केली. इंडियाच्या मागील बैठकीत ममतांनी मागील वर्षीच्या अखेरपर्यंत जागावाटप निश्चित करण्याची भूमिका मांडली. पण, कॉंग्रेसने तशी भूमिका घेतली नाही.
एवढेच नव्हे तर, संभाषणही टाळले, असे अभिषेक पत्रकारांशी बोलताना म्हणाले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अधिररंजन चौधरी सातत्याने बंगाल सरकारवर करत असलेल्या टीकेने तृणमूल नाराज झाल्याचेही याआधीच समोर आले. त्याबाबीलाही अभिषेक यांनी दुजोरा दिला. मित्रपक्ष असूनही चौधरी तृणमूलवर टीका करत राहिले, असे त्यांनी नमूद केले.
Hemant Soren : अखेर मुख्यमंत्री हेमंत सोरेन रांचीतील निवासस्थानी पोहचले ; घेतली आमदारांची बैठक