मुंबई – राज्यात लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते ४ मे या कालावधीत कलम १८८ नुसार ९३ हजार ७३१ गुन्हे दाखल झाले असून १८ हजार ४६६ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १८१ घटनांची नोंद झाली असून यात ६६१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन ..
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने काही पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले.सध्या ४० पोलीस अधिकारी व ३७८ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन झाले.