राजगुरूनगर (प्रतिनिधी) : राजगुरूनगर शहरात पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या दारूच्या दुकानासमोर दारू खरेदीसाठी फिजिकल डिस्टन्सिग न पाळता तळीरामांना लांबच लांब रांगा लागल्या.
राजगुरुनगर येथे आज पासून दारू विक्री सुरु झाल्याने सकाळीपासून तळीरामांनी रांगा लावल्या. काल पासून दारू दुकाने उघडणार होती. त्यामुळे तालुक्यातील तळीरामांनी सकाळीपासून मिळेल त्या वाहनाने खेड मध्ये येत दुकानासमोर रांगा लावल्या मात्र दुकान न उघडल्याने त्यांची घोर निराशा झाली होती.
आज वृत्तपत्रात खेड मधील दारू दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याची बातमी प्रसिद्द झाली त्याची कात्रणे सोशल मीडियावर प्रसिद्द झाल्याने तळीरामांनी मोठी गर्दी केली. सोशल डिस्टन्स मात्र पाळत नसल्याचे लक्षात आल्याने दुकानदाराने चक्क रस्सी बांधून तीन रांगा करून सोशल डिस्टन्स पाळला तरच दारू विक्री होईल अशी भूमिका घेतल्याने तळीराम शुद्दीवर येत त्यांनी सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी केली.
राजगुरूनगर शहरात आज दारू विक्रीला सुरुवात होताच नवराबायकोतील कलह वाढून त्यांची भांडणे पोलीस ठाण्यापर्यंत आली आहेत. एकीकडे महसूल नादात सरकार घराघरात भांडणे लावण्याचे काम करीत आहे अशी प्रतिक्रिया एक पीडित महिलेने व्यक्त केली आहे. दारू बंदी योग्य निर्णय होता. दारू विक्री सुरू झाल्याने तालुक्यात पुन्हा अशांतता प्रस्तापित होऊन गुन्हेगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.