औरंगाबाद- अवकाशात नेहमीच विलक्षण घटना घडत असतात. शनिवारीदेखील अशाच एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सूर्याच्या भोवती खळे निर्माण झाले. ही भौगोलिक घटना जरी दुर्मिळ असली, तरी मागील 2-3 वर्षांत हे दृश्य दिसून येत आहे.
दरम्यान, असे खळे पडल्याने दुष्काळ पडतो, असा समज आहे. पण, सूर्याचे खळे आणि दुष्काळ याचा संबंध नसल्याचे तज्ज्ञांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
शनिवारी हे दृश्य अनेकांनी पाहिले आणि मोबाइल कॅमेरात कैद केले. पण, ही घटना का घडते याची चर्चा औरंगाबादमध्ये आहे