Maharashtra Weather – राज्यात काही दिवसांपासून हवामानामध्ये प्रचंड बदल होताना दिसत आहे. राज्यासह देशात एकीकडे कडक ऊन, तर दुसरीकडे काही भागात पावसाचे वातवरण आहे.
त्यातच राज्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतिष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये पावसाने आज झोडपले तर मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यात एकाचवेळी दोन वेगवेगळ्या प्रकारचे हवामान झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.