नगर -लोकमान्य टिळक व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपाची भावना निर्माण केली आहे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
शहर जिल्हा भाजपच्यावतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप संघटक सरचिटणीस ऍड. विवेक नाईक, अमित गटणे, पुष्कर कुलकर्णी, शिवाजी आढाव उपस्थित होते.
महापौर म्हणाले, टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करुन, सांस्कृतिक, धार्मिक, पौराणिक ही महाराष्ट्राची संस्कृती जगासमोर आणली. तसेच साठे यांनी पोवाड्याच्या माध्यमातून आपली कला व संस्कृती समाजामध्ये रुजविली.