मुंबई – राज्यात आज करोनाच्या 5318 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 67 हजार 600 रुग्णांवर (ऍक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज 4430 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 84 हजार 245 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.94 टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 8 लाख 96 हजार 874 नमुन्यांपैकी 1 लाख 59 हजार 133 नमुने पॉझिटिव्ह (17.74 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 65 हजार 161 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 36 हजार 925 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज 167 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 86 मृत्यू मागील 48 तासांमधील, तर उर्वरित 81 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.57 टक्के एवढा आहे.