मुंबई – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी 504 विविध गुन्हे सायबर सेलने दाखल केले आहेत. या प्रकरणी आतापर्यत 262 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सायबर सेलच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 504 गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. या गुन्ह्यातील आरोपीने करोना महामारीला धार्मिक रंग देणारा टिकटॉक व्हिडिओ बनवून प्रसारित केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव तयार झाला होता. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.
दरम्यान, शासनाने करोना महामारीच्या काळात म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हालचालींवर काही निर्बंध आखून दिले होते व त्याकरिता नियम देखील केले होते. सध्याच्या काळात सरकारने हे घातलेले निर्बंध, नियम आणि अटी या शिथिल केल्या आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपले दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल.