मुंबई – विरोधकांनी सकारात्मक मुद्दे मांडावेत, त्याच्यावर चर्चा केली जाईल. अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर आमचा भर देऊ. रखडलेल्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. मुंबईतील प्रकल्पांचे काम वेगात सुरू आहे. या अधिवेशनात धोरणात्मक निर्णय होतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
उद्यापासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विरोधकांनी आज चहापानावर बहिष्कार घातला. त्यांच्यासोबत चहापान टळलं हे बरंच झाले. कारण सत्ता गेल्यामुळे विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आम्ही समजू शकतो. लोकशाहीत बहूमताला महत्व आहे. आमचे सरकार हे बहूमताचे सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
आलेल्या पाहुण्यांना चहापान नको?
आरोप करताना त्याला पुरावे पाहिजेत. नारायण राणे यांना जेवत्या ताटावरून उठवले, केतकी चितळेला तुरूंगात टाकले, कंगना रणौतचे घर तोडले, गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीसांना तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. आता ते आमच्यावर खोटेनाटे आरोप करत आहेत. आम्हाला लोकांचे प्रेम मिळत असल्याने अजित पवारांच्या पोटात दुखत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
#MahaBudget2023 : लोकायुक्त विधेयक पास करण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावं – उपमुख्यमंत्री फडणवीस
वर्षा बंगल्यावर लोक भेटायला आल्यानंतर त्यांना चहापाणी द्यायला नको का? ही आपली संस्कृती आहे. परंतु, यावरूनही पवार आरोप करत आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.