मुंबई – लोकायुक्तांचे विधेयक मंजूर करण्याचा या विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रयत्न असेल. सर्व पक्षांनी लोकायुक्ताच्या कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केले आहे. उद्यापासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
उद्यापासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात लोकहिताचे निर्णय घेतले जातील. विरोधकांनी विधीमंडळात लोकहिताचे मुद्दे मांडवेत. त्यांच्या प्रश्नावर उत्तरे द्यायला आम्ही तयार आहोत, असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबरोबरच विरोधी नेत्यांना धमकी देण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. त्याची चौकशी करण्यात येईल. परंतु, संजय राऊत हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी असे काही तरी वक्तव्य करत असतात, असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला.
4 आठवड्याचे हे अधिवेशन किमान 3 वर्षांनी होत आहे.
लोकहिताचे निर्णय या अधिवेशनात घेतले जातील.
3विधेयके प्रलंबित आहेत आणि 7नवीन प्रस्तावित आहेत.लोकपाल कायदा पारित करण्यासाठी विरोधकांनी मदत करावी,अशी आमची अपेक्षा आहे: देवेंद्र फडणवीस#BudgetSession2023 #DevendraFadnavis @Dev_Fadnavis pic.twitter.com/VvsOUEZBsk— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) February 26, 2023
चहापान टळले ते बरंच- शिंदे
विरोधकांनी सकारात्मक मुद्दे मांडावेत, त्याच्यावर चर्चा केली जाईल. अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर आमचा भर देऊ. रखडलेल्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. मुंबईतील प्रकल्पांचे काम वेगात सुरू आहे. या अधिवेशनात धोरनात्मक निर्णय होतील. विरोधकांनी आज चहापानावर बहिष्कार घातला. त्यांच्यासोबत चहापान टळले हे बरंच झाले. सत्ता गेल्यामुळे विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. लोकशाहीत बहूमताला महत्व आहे. आमचे सरकार हे बहूमताचे सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
आलेल्या पाहुण्यांना चहापान नको?
आरोप करताना त्याला पुरावे पाहिजेत. नारायण राणे यांना जेवत्या ताटावरून उठवले, केतकी चितळेला तुरूंगात टाकले, कंगना रणौतचे घर तोडले, गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीसांना तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. आता ते आमच्यावर खोटेनाटे आरोप करत आहेत. आम्हाला लोकांचे प्रेम मिळत असल्याने अजित पवारांच्या पोटात दुखत आहे. वर्षा बंगल्यावर लोक भेटायला आल्यानंतर त्यांना चहापाणी द्यायला नको का? ही आपली संस्कृती आहे. परंतु, यावरूनही पवार आरोप करत आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.